Summary of the Book
भगवान् श्री रामचंद्र म्हणाले, ''हे प्रिय हनुमन्ता, तू माझी जी सेवा केली आहेस, त्याचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. मी तुझा कायमचा ऋणी झालो आहे. जोपर्यंत रामायणाच्या कथेचे श्रवण केले जाईल, तोपर्यंत तुझेही आयुष्य कायम टिकून राहील. नि:संदेह, जोपर्यंत या पृथ्वीचे अस्तित्व आहे, तोपर्यंत रामायणाची कथाही अमर आहे.''