Summary of the Book
श्री स्वामी सखा यांचे
मनन-चिंतन, विचार, काव्य संपदा याचे संकलन ...
श्री स्वामी सखांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन स्वतःची ओळख करुन घेऊन आपल्या ईष्ट गुरुंची ओळख करुन घेतली व त्या गुरुंची ज्ञानसंपदा सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविली. त्यागाची परिभाषा काय आहे हे या व्यक्तिकडे बघून अनुभवास येते - आहे ते सोडून देणे वा जे सहज प्राप्य आहे त्याचा अस्विकार करणे, हे श्री स्वामी सखा यांच्या जीवन प्रवासातून कळते.
सर्वांत राहून सुध्दा अलिप्त कसे रहावे व गुरुध्यास पूर्ती कशी करावी हे स्वामी सखा यांच्या कार्यातून कळते. ‘पैशापेक्षा माणूस कमवा’ या त्यांच्या उपदेशावरुन समर्थवाडी नावाचे स्थान व कार्य त्यांच्याच मार्गदर्शनातून आज उभे आहे. आपल्याकडे आलेल्या गुरुभक्तांमधील चांगले गुण बघून गुरुप्रमाण सेवा करुन घेतली व त्यांच्या दूर्गुणांकडे कानाडोळा केला. ‘बाप दाखव नाहीतर श्राध्द कर’ अशी कर्मठ वृत्ती बाळगून स्वतः अवघड वाटणारे कार्य तडीस नेले व काही काम भक्तांकडून करुन घेतले.
‘मी कोण.... कोठोनी आलो - कुठेची निघालो’ याचे उत्तर शोधताना गुरुभक्तांना कळत नकळत एक वाट दाखविली. भक्तांसमोर निष्ठा व सातत्य व अशा अनेक सद्गुणांनीआपला संसाररुपी समुद्र कसा भरुन घ्यावा याचा आदर्श ठेवला. त्यांच्या सहवासातून श्री दत्त संप्रदायातील अवतार अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेतून हा ‘श्रीदत्त सुवास’ बहरला आहे. सर्व भक्तांपर्यंत हा सुवास पोहोचावा ही या लेखना मागची भावना.