Summary of the Book
कल्याणी मारुतीराव वाघ यांनी लिहिलेली ही कादंबरी महाविद्यालयीन जीवनावर आहे. महाविद्यालयीन कालखंड हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सोनेरी दिवसांचा अशतो. या कालावधीतील तारुण्यसुलभ भावना, प्रेम आणि तरुणाई यांचं प्रतिबिंब या कादंबरीत नेमकेपणानं व्यक्त झालं आहे. अनुराधा ही कादंबरीची नायिका आणि मंदार हा नायक. पण नंतर या कथानकात श्रीधर या पात्राचा प्रवेश होतो आणि कथानकाला वळण लागतं. साधीसोपी प्रेमकथा, पण नायिका अनुराधाला खूप त्रास सहन करावा लागतो. परिस्थिती या प्रेमात कशी खलनायिका होते ते या कादंबरीत दिसतं. पात्ररचना आणि ओघवती शैली यामुळे कादंबरी वाचनीय झाली आहे.