Hard Copy Price:
25% OFF R 210R 158
/ $
2.03
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
एखाद्याचे मन जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो, असे म्हणतात. त्यामुळेच विविध पाककृती तयार करणे आणि त्या खाऊ घालणे याकडे गृहिणींचा कल असतो. अर्थात, या पाककृतींमध्ये देश - विदेशनिहाय वैविध्यही आढळते. अशाच विविध पाककृतींचा खजिना म्हणजे स्वादस्मृती हे अनुपमा कुलकर्णी यांचे पुस्तक.
नेहमीच्या भाज्या,आमट्या,सोलकढी, चटण्या, गोडाचे पदार्थ, जाम- मुरांबे, विदेशी पदार्थ, मसाले यांच्या कृती या पुस्तकात आहेतच. मात्र, रानभाज्यांच्या पाककृती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कुड्याच्या फुलांची, शेगांची भाजी, बिरड्याची भाजी, टाकळा, भारंगा,केनाकुर्डू, कोवळा, कुवाळू आदी रानभाज्यांची ओळख अनेकांना या पुस्तकाच्या माध्यमातून होईल. जुन्या काळातील पाककृतींचा ठेवा जतन व्हावा, या हेतूने पुस्तक लिहिण्याची भूमिका लेखिका मांडते.
रसिल्या नात्यांच्या सुग्रास स्मृती --- !ज्या पुस्तकांना प्रथितयश प्रकाशानांची पार्श्वभूमी असते ती पुस्तकं बाजारात येण्याआधीच गाजायला लागतात.त्यावर भरभरून परीक्षणं येतात .चर्चा होतात. हे दर्जेदार पुस्तकांसठी घडावंही.पण अगदी सुमार पुस्तकांनाही असा गाजावाजा लाभतो तेव्हा मात्र वाचक म्हणून स्वतःला काही कळतं की नाही यावर अडखळायला होतं.
या उलट काही पुस्तकं निव्वळ हौशीखातर ,आपापल्या परिघासाठीच थोड्या संकोचानं काढली जातात त्याची दखलही तेवढ्याच परिघात घेतली जाते.आप्तमित्रांकडून मुक्त कौतुक होतं आणि लेखकाला धन्यता वाटते.
पण -- ब-याचदा त्या तळ्यातल्या पिल्लाला माहीत नसतं की तो राजहंस आहे.त्याची जागा तळं नसून सरोवर आहे.
त्याच जातकुळीतलं एक पुस्तक माझ्या हाती लागलं .
स्वादस्मृती - लेखिका अनुपमा कुळकर्णी.
मी त्यांच्या आप्तेष्ट परिवारातली असल्याने मला ते वाचायला मिळणं साहजिकच होतं.ते वाचल्यावर खरंतर मी ही त्यांना छान छान म्हणून प्रतिक्रिया देणं तितकंच साहजिक होतं. पण तसं झालं नाही.कारण ते वाचल्यावर हे पुस्तक जास्तीत जास्त तरूण तरूणींपर्यंत जायला हवं असं प्रकर्षानं वाटत राहिलं.